मुंबई

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांची गॅरंटी कोण घेणार? सामनाच्या अग्रलेखातून ठाकरेंचा सवाल

•अवकाळी पावसाचा तडाखा… सरकार राजकीय पक्ष व नेत्यांच्या फोडाफोडीत रमले

मुंबई :- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून पुन्हा एकदा राज्य सरकार सह केंद्र सरकारवर निशाणा साधला असून सध्या राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा दिसत आहे. शेतकऱ्यांची गॅरंटी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत सरकारवर पुन्हा एकदा सामनाच्या वृत्तपत्रातून टीका करण्यात आली आहे. सरकार राजकीय पक्ष व नेत्यांना फोडाफोडीचे राजकारणात मग्न असल्या मुळे शेतकऱ्यांची गॅरंटी कोण घेणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. Uddhav Thackeray

अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व फळबागांचे गेले काही दिवस अतोनात नुकसान सुरू असताना सरकार मात्र राजकीय पक्ष व नेत्यांच्या फोडाफोडीत रमले आहे. महसूल प्रशासनही तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. अवकाळीच्या तडाख्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी होतील व शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल, याचे कुणालाच काही पडलेले नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीची ‘गॅरंटी’ कोणी घेणार आहे काय? Uddhav Thackeray

अवकाळीचा तडाखा…

शेतकऱ्यांची ‘गॅरंटी’ कोण घेणार?

निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत येणारी संकटे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. शेतकऱ्यांना सुखाने जगूच द्यायचे नाही, असा चंगच जणू निसर्गाने बांधलेला दिसतो. गेल्या पंधरवड्यापासून सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांना वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे व त्यामुळे शेतातील काढणीला आलेल्या पिकांना याचा जबर फटका बसला आहे. राज्यातील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी गारपीट व अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. शिवाय गारपीट व अवकाळीचा हा तडाखा आणखी काही दिवस असाच सुरू राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस व गारपिटीच्या या तांडवात शेतमालाचे आणखी किती नुकसान होणार, या भयाने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. वास्तविक जानेवारी महिन्यात थंडीचा कडाका संपून फेब्रुवारीच्या प्रारंभी उन्हाळ्याची चाहूल सुरू होते. त्याप्रमाणे उन्हाचा तडाखा सुरूही झाला होता. शेतात उभ्या असलेल्या गहू, ज्वारी, हरभरा इत्यादी पिकांना वाळण्यासाठी काढणीपूर्वी तापमानाचा पारा चढलेलाच असावा लागतो. Uddhav Thackeray

मात्र काही दिवस वातावरणातील उष्मा वाढल्यानंतर हवामानात बदल झाला आणि गेल्या 15 दिवसांत दोन वेळा विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांनी गहू व ज्वारी कापून वाळण्यासाठी शेतात त्यांचे ढिगारे रचून ठेवले होते, तर काही शेतकऱ्यांची पिके सोंगणीला आली होती. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने मळणी यंत्रात जाण्यासाठी सज्ज असलेला गहू पुरता भिजवून टाकला, तर कुठे वादळी वारे व पावसाने उभ्या पिकांना मोठाच फटका दिला. पिवळ्या धमक झालेल्या गव्हाच्या ओंब्या पावसात भिजल्याने गव्हाच्या प्रत्येक दाण्यावर आता पांढरे डाग पडतील आणि गव्हाचा रंगही बदलून जाईल. अशा डागी व पांढऱ्या पडलेल्या गव्हाला बाजारात भाव मिळत नाही. हरभऱ्याचीही तीच कथा. काढणीला आलेल्या हरभऱ्यावरील वाळलेले कवच वारे व पावसाने फुटले व अनेक ठिकाणी हरभऱ्याचे दाणे मातीत मिसळले. या हरभऱ्याला आता जागेवरच कोंब फुटतील. गेली दोनेक वर्षे ज्वारीचे भाव वाढल्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ज्वारीची पेरणी केली होती. मात्र काढणीला आलेल्या ज्वारीलाही गहू व हरभऱ्याप्रमाणेच जबर फटका बसला. केवळ या तीन पिकांनाच अवकाळी व गारपिटीचा फटका बसला असे नाही. भाजीपाला, शेड-नेटमधील मोठ्या गुंतवणुकीची पिके व हजारो हेक्टरवरील टरबूज अथवा कलिंगडाच्या पिकाचेही या अवकाळीने अतोनात नुकसान केले. Uddhav Thackeray

शेतकऱ्यांनी जिवापाड मेहनत घेऊन वाढवलेल्या टरबुजांवर अवकाळी पावसाने आता काळे डाग पडतील आणि १० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या टरबुजाला आता २ रुपयांचा तरी भाव मिळतो की नाही, अशी भीती टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे. याशिवाय आंबा, मोसंबी, डाळिंब आणि द्राक्षाच्या बागांचेही अवकाळी व गारपिटीच्या फटक्याने मोठे नुकसान झाले आहे. आंब्याचा मोहर गळून पडला आहे. अनेक ठिकाणी कच्ची मोसंबी तुटून त्यांचा फळबागेत खच पडला आहे. गेले तीन-चार दिवस विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपिटीचा धुमाकूळ सुरू आहे. शेतकऱ्यांनी कित्येक दिवस खपून व काबाडकष्ट करून घेतलेल्या पिकांचे, फळबागांचे या अवकाळीने अपरिमित नुकसान केले. त्यातच हवामान खात्याने आणखी २ मार्चपर्यंत ‘यलो अलर्ट’ Uddhav Thackeray

जारी केल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व फळबागांचे गेले काही दिवस अतोनात नुकसान सुरू असताना सरकार मात्र राजकीय पक्ष व नेत्यांच्या फोडाफोडीत रमले आहे. महसूल प्रशासनही तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. अवकाळीच्या तडाख्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी होतील व शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल, याचे कुणालाच काही पडलेले नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीची ‘गॅरंटी’ कोणी घेणार आहे काय? Uddhav Thackeray

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0