मुंबईठाणे
Trending

Mumbai Weather News : पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मुंबईत वाढणार उष्णता, मार्चमध्येच तापमान 40 अंशांच्या पुढे जाणार! जाणून घ्या काय आहे हवामान खात्याचा इशारा

Mumbai Weather News : मुंबई आणि परिसरात जोरदार पूर्वेकडील वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील आठवडाभरात तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होऊन उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मुंबईचे तापमान 39-40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.

मुंबई :- पूर्वेकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे गुरुवारपासून मुंबईसह एमएमआर प्रदेशात तापमानात वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. Mumbai Weather ही स्थिती आठवडाभर कायम राहू शकते. हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे की,अरबी समुद्रातील उच्च दाबामुळे समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग मंदावणार आहे. त्यामुळे पूर्वेकडून वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांची उपस्थिती वातावरणात वाढणार आहे. त्यामुळे तापमानात वाढ होईल. त्यामुळे मुंबईत उष्मा वाढणार असून उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण होणार आहे.

सांताक्रूझमध्ये 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याच वेळी, आर्द्रता 28 टक्के नोंदवली गेली. कुलाब्याचे तापमान 33.4 अंशांवर नोंदवले गेले. हवामान तज्ज्ञ आंग्रे म्हणाले, हवामानाचे स्वरूप बदलत असल्याने तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील तापमान 39 ते 40 अंशांपर्यंत पोहोचू शकते, तर ठाण्यात तापमान 41 अंशांपर्यंत जाऊ शकते. फेब्रुवारी महिन्यात मुंबईचे कमाल तापमान 38 अंशांवर पोहोचले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0