मुंबई

Samruddhi Mahamarg : इगतपुरी–आमणे 76 किमी टप्पा आता सुरू; नागपूर-मुंबई प्रवास 8 तासांत शक्य

शिंदेंच्या हस्ते फडणवीसांची गाडी… नेतृत्व आणि मैत्रीचा ‘समृद्ध’ संगम! ठाणे, (पडघा) | राज्याच्या आधुनिक विकासात मैलाचा दगड ठरलेला ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ आज अधिकृतपणे पूर्णत्वास पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमणे या 76 किमी लांबीच्या अंतिम टप्प्याचे भव्य उद्घाटन झाले. या टप्प्यानंतर नागपूर ते मुंबई हा 701 किलोमीटरचा प्रवास आता केवळ 8 तासांत शक्य होणार आहे.

हा महामार्ग केवळ रस्त्यांचा नाही, तर ‘विकासाची धमनी’ आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योगपती आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी संधींच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत.

आजच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती. या ऐतिहासिक प्रवासाच्या सुरुवातीला एक अनोखा क्षण पाहायला मिळाला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांची गाडी चालवली. याआधी शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी त्यांच्या गाडीला स्टेअरिंग दिलं होतं – हा एक प्रतीकात्मक मैत्रीचा क्षण ठरला.

या महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील शहरे, उद्योग, शेती, पर्यटन आणि रोजगाराला मोठा हातभार लागणार आहे. समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने हे एक ‘सोन्याचं पाऊल’ ठरणार, यात शंका नाही!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0