महाराष्ट्रमुंबई

Punyashlok Ahilyadevi Nagar : अहमदनगर शहराचे नामकरण, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर”मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई :- राज्य सरकारच्या एकाच हप्त्यातील दोन मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने विविध निर्णय घेतले असून अहमदनगर शहराचे नाव बदलण्यात आले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर Punyashlok Ahilyadevi Nagar असे नामकरण आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आले आहे. तर अशा वर्कर यांच्या मानधनात पाच हजाराची भरीव वाढ करण्यात आली आहे. राहुल शेवाळे यांनी दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून मुंबईच्या आठ ब्रिटिश कालीन रेल्वे स्थानकांचे नामकरण करण्यात येणार असल्याचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी एका सप्त्यात दोनदा मंत्रिमंडळाची बैठक राज्य सरकारकडून घेण्यात आली असून गेल्या दोन ते पाच दिवसात अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाकडून घेण्यात आले आहे. या निर्णयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात हल्ला करण्यात टीका करण्यात आले आहे.

मंत्रिमंडळाचे निर्णय

1.मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर.

2.पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला 15 हजार रुपये.

3.अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता.

4.केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या 153 कोटी हिश्श्याला मान्यता.

5.श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार.

6.कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. 3200 कोटींचा प्रकल्प.

7.भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत 50 वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज.

8.राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ.

9.महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार.

10.मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. 35 गावांना लाभ होणार.

11.मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. 125 हेक्टर जमीन सिंचित करणार.

12.शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता संस्थांना 25 हजार रुपये अनुदान.

13.मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.

14.आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.

15.कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी 9020 कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.

16.शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार
11 हजार 585 कोटींच्या प्रकल्पास मान्यता.

17.पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार.

18.पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता.

19.म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन.

20.आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ.

21.मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार.

22.मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता.

23.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते.

24.भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार.

25.महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन.

26.जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. 2453 कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता.

27.दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0