मुंबई

Priyanka Chaturvedi : बदलापूर घटनेवरून प्रियांका चतुर्वेदी यांनी शिंदे सरकारला धारेवर धरले.

बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुरड्यांवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन,दरम्यान‌ प्रियांका चतुर्वेदी यांनीही सरकारला धारेवर धरले आहे.

मुंबई :- बदलापूर येथील शाळेतील दोन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेबाबत बदलापुरात लोक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या (ठाकरे) कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनीही विरोध दर्शवला आहे. आंदोलनादरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, “महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 10 दिवसांत 12 घटना घडल्या आहेत. ठाण्यात POCSO कायद्यांतर्गत दररोज एक केस आहे. या सगळ्याचा आम्ही निषेध करत आहोत. उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रात भीषण गुन्हे घडत आहेत.

शक्ती कायद्याचे काय झाले?

प्रियांका चतुर्वेदी यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला धारेवर धरले आणि म्हणाल्या, “आंदोलन करणाऱ्या महिला सांगत आहेत की, त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभ नकोत, तर त्यांना महिलांची सुरक्षा हवी आहे. महाराष्ट्रातील महिला शक्ती कायद्याबद्दल विचारत आहेत. मी स्वतः राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे की तो कायदा होऊन तीन वर्षे झाली आहेत, पण त्याचे काय झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0