मुंबई :- राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशन सोमवारपासून (26 फेब्रुवारी) राज्यात चालू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि अनेक अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत, मात्र ते धाब्यावर बसवून घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी केवळ ‘खोक्यां’ साठी बदल्या रखडवून ठेवल्या आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. Aaditya Thackeray
यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंग चहल व अनेक अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. चहल व अन्य अतिरिक्त आयुक्तांच्या रुटिन बदल्या ओव्हरडयू होऊनही केल्या जात नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. Aaditya Thackeray
मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासकांना असे निर्देश दिले आहेत की, निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी मोठमोठी कामे मंजूर करून घ्या आणि इतके इतके खोके आम्हाला द्या, तरच तुमच्या बदल्या होणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले. Aaditya Thackeray
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…