•फडणवीस-चव्हाण रणनीती यशस्वी; नवी मुंबईत, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपाकडून ‘स्वबळा’ची चाचपणी सुरू
ठाणे/कल्याण | ठाणे जिल्ह्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असलेली पकड ढिली करत, अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निकालांमुळे संपूर्ण जिल्ह्यात ‘शत-प्रतिशत’ भाजपचा नारा पुन्हा एकदा घुमू लागला असून, आगामी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपात भाजप आता मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे.
शिंदे सेनेची रणनीती अंगलट
अंबरनाथ आणि बदलापूर हे वर्षानुवर्षे शिवसेनेचे बालेकिल्ले राहिले आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये स्वतः तळ ठोकला होता, तर बदलापुरात वामन म्हात्रे यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन भाजप आमदार किसन कथोरे यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटीत भाजपवर दबाव वाढवण्यासाठी ही खेळी खेळली गेली होती, मात्र मतदारांनी भाजपला कौल दिल्याने आता शिंदे गटाला भाजपसमोर नरमाईची भूमिका घ्यावी लागणार आहे.
फडणवीस आणि चव्हाणांचा करिष्मा
या विजयाचे मुख्य शिल्पकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाहिले जात आहे.
बदलापूर: फडणवीसांनी येथे सभा घेऊन ‘विकास अजेंडा’ मांडला, ज्याला मतदारांनी प्रतिसाद दिला.
अंबरनाथ: अत्यंत अटीतटीच्या लढतीत फडणवीसांनी ‘भयमुक्त शहर’ असा नारा दिला होता. शिंदे पिता-पुत्रांचा प्रभाव असूनही येथे भाजपने विजय खेचून आणला, जो रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मोठा राजकीय विजय मानला जात आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…