ठाणे

Thane Crime News : काठी,चाकू आणि सूरी‌ने वार करून खून करण्याचा प्रयत्न, पाच जणांच्या टोळीचा भ्याड हल्ला

•पाच जणांच्या टोळीने वार करून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपींना राबोडी पोलिसांनी अटक, तीन आरोपी फरार

ठाणे :- दोघे भाऊ जनता बेकरी, राबोडी परिसरातून जात असताना पाच जणांच्या टोळीने त्यांच्यावर भ्याड हल्ला केला आहे. यामध्ये फिर्यादी वसीम गुड्डूभाई कुरेशी (40 वर्ष) हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे. या पाच जणांच्या टोळीने फिर्यादी याच्यावर सुरी, काठी आणि चाकूने वार करत गंभीररित्या जखमी केले आहे. तसेच राबोडी पोलिसांनी पाच पैकी दोन आरोपींना अटक केली आहे. तर तीन आरोपी हे फरार असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

आरोपी आरीफ जफर शेख, (28 वर्ष, राबोडी) ,ख्याजा शेख,(24 वर्ष, रा.मनिषा नगर, कळवा) आदिल जफर शेख, (22 वर्ष, रा.बापुजीनगर, राबोडी ), जावेद जफर शेख, (36 वर्ष, रा.राबोडी, ठाणे ) राहुल यादव (25 वर्ष) यांच्याविरुद्ध वसीम गुड्डूबाई कुरेशी (40 वर्ष, दुसरी राबोडी ठाणे) यांनी फिर्यादी दिली आहे. राबोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, वासीम गुड्डूभाई कुरेशी आणि त्याचा भाऊ मौलाअली सोबत जनता बेकरी परिसरातून जात असताना पाच जणांनी वसीम याच्यावर‌ चाकू, काट्या आणि सूरा या हत्याराने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून त्याच्या तोंडावर, छातीवर आणि डाव्या हातावर वार करून जखमी केले आहे. वसीम याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असून त्यांने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींच्या विरोधात बि.एन.एस.चे कलम 109,118(1),189(2),189(4),190,191(2),191(3),351 (3) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या पाच आरोपींपैकी आसिफ शेख आणि राहुल यादव या दोन आरोपींना अटक केली आहे. तर उर्वरित तीन आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किशोर खरात हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0