Vasai Crime News : 24 वर्षांनंतर उत्तरप्रदेशातून फरार आरोपी वसईत अटक; विरार येथील खुन उघडकीस

Vasai Crime Branch Unit 2 Arrested Criminal : रिक्षा भाड्याच्या वादातून घडलेला खून; फरार आरोपींचा शोध उत्तरप्रदेशात
वसई :- वसई पोलीस विभागाला 24 वर्षे जुन्या आणि उघडकीस न आलेल्या खुनाच्या प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. 24 वर्षांपूर्वी विरार येथे झालेल्या गंभीर खुनाच्या आरोपी मामू उर्फ छोटे बबुओं ओमप्रकाश श्रीसाहुनी दिवाकर याला उत्तरप्रदेशातील कानपुर जवळील श्रीनगर येथून गुन्हे शाखा कक्ष 2 वसईच्या तपास Vasai Crime Branch Unit 2 पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे गेल्या दोन दशके फरार असलेला हा आरोपी अखेर न्यायाच्या पोलीस पथकाच्या ताब्यात आला आहे.
विरार पोलीस ठाण्यात 14 ऑक्टोबर 2001 रोजी नोंदलेल्या गुन्हे अंतर्गत, 46 वर्षीय मोहरमअली मोहमद इब्राहीम अली याच्या अज्ञात कारणावरून चाकूने पोटावर वार करून त्याचा खून झाल्याची नोंद आहे. या प्रकरणाचा तपास अधिक चपखल करण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा कक्ष-2 वसईने समांतर तपास सुरु केला होता. या तपासादरम्यान गुन्ह्याशी संबंधित आरोपींचा शोध घेण्यात आला.
24 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत गुन्हे शाखेला मिळाले यश
तपासात असे समोर आले की, आरोपी मामू आणि त्याचा सहकारी हारुनअली मुस्तकीन अली सय्यद हे दोघेही रिक्षा चालवायचे; मात्र त्यांना रिक्षांचे लायसन्स व परमिट नव्हते. त्यांच्यावर रिक्षा भाडे न देण्याच्या वादातून हा भयंकर खून झाला होता. आरोपी फरार झाल्यामुळे तपास ठप्प झाला होता. मात्र गुन्हे शाखेने त्याचा मोबाईल नंबर तांत्रिक विश्लेषण करून उत्तरप्रदेशमधील कानपुर येथून त्याचा ठिकाण शोधून काढला.
पोलीसांनी गुप्त तपास करून आरोपीच्या संपर्कात असलेल्या नातेवाईक आणि मित्रांशी संपर्क साधला आणि त्याच्या मोबाईलवरून मिळालेल्या माहितीनुसार 27 एप्रिल 2025 रोजी कानपुर येथून आरोपीची अटक केली. आरोपीने कबुली दिली की खुनाच्या दिवशी त्यांनी रिक्षा चालवण्याच्या भाड्याच्या वादातून आपला राग दाखवत खून केला.
पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. पोलीस आयुक्तांनी यशस्वी कारवाईचे कौतुक करत असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या जुन्या आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यांवर या कारवाईने समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे की, कोणताही गुन्हा असो, तपास होतोच आणि दोषीांना न्याय मिळतोच.
या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर विश्वास वाढेल आणि नागरिकांना न्याय मिळण्याची आश्वासने अधिक बळकट होतील. 24 वर्षे फरार असलेल्या आरोपीला पकडून आणणे हा पोलीस यंत्रणेचा मोठा विजय असल्याचे समजले जाते.


