
Operation Sindoor Latest Update : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने बुधवारी (7 मे 2025) हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
ANI :- पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, बुधवारी (7 मे 2025) भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ला केला.हे दहशतवादी अड्डे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होते. लष्कराच्या या हवाई हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. हे हवाई हल्ले त्या दहशतवादी तळांवर करण्यात आले जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करण्यात आले. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हवाई हल्ल्यात एकूण 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.
भारतीय लष्कराने म्हटले आहे की, हवाई हल्ल्यात कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले नाही. लक्ष्यांची निवड आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीमध्ये भारताने बराच संयम दाखवला आहे.पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय लष्कराने हे पाऊल उचलले आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाईल या आमच्या वचनबद्धतेचे आम्ही पालन करत आहोत, असे लष्कराने म्हटले आहे.



