पुणे
Trending

Daund New : चांगल्या सुस्थितीत रस्त्यावर पुन्हा दुबार काम काढून जनतेच्या पैशाची उधळपट्टी ; नागरिकांची कसरत सुरू ; विकास रखडल्याची चर्चा

[ नाथाचीवाडी, लडकतवाडी ते दुधाने चौक रस्त्यांची कामे अर्धवट ]

दौंड प्रतिनिधी यवत, ता. २९ नाथाचीवाडी, लडकतवाडी ते दुधाने चौक विविध भागात रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विविध भागात रस्ते केले जात आहेत. मात्र याच रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडल्याने विकास रखडल्याची चर्चा होत आहे.
नाथाचीवाडी, लडकतवाडी ते दुधाने चौक पिंपळगाव, कापरेवस्ती भागात कोट्यवधींचे रस्ते मंजूर झाले, माञ ही कामेच नागरिकांसाठी वैताग आणणारी ठरत आहेत. नाथाचीवाडी ते लडकतवाडी ते दुधाने चौक, पिंपळगाव भागातील मुख्य रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी जुने चांगल्या स्थितीत असणारे रस्ते खोदून ठेवले आहेत. मात्र अनेक दिवस झाले तरी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामाचा दर्जा खालावल्याची नागरिकांची ओरड आहे.



गेल्या अनेक दिवसांपासून प्रमुख रस्ते अपूर्णावस्थेत आहेत. मात्र, ही कामे का रखडली याच उत्तर कुणी देत नाहीये. काही ठिकाणी काम सुरू असले तरी त्याला म्हणावी तशी गती नाही. त्यामुळे कामे सुरू झाल्यानंतरही नागरिकांची कसरत संपलेली नाही. कुठे पाइपलाइनचे काम, कुठे रस्त्याचे काम, कुठे पाणीपुरवठ्याचे काम आदी कामे लवकर होत नाहीत. त्यामुळे हे अडथळे अनेक दिवस तसेच असतात. रस्त्यांवर पडलेल्या अस्तव्यस्त खडीच्या रस्त्यातून वाहन चालवत जीवाशी कसरत करावी लागते. सोबतच अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो.


कामे कधी पूर्ण होणार ? …
रस्त्याची कामे सुरू असली तरी ती कधी पूर्ण होतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. संथगतीने कामे होणार असतील तर आणखी पावसाळा येईल, असे म्हणण्यापर्यंत वाईट चित्र आहे. संबंधित यंञणांना नागरिकांच्या समस्यांशी काहीही देणे घेणे नाही, असेच पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात काम करणाऱ्या संबंधित यंञणाच ढिम्म स्टाइलने काम करत आहेत. लोकप्रतिनिधींनाही त्या जुमानत नाहीत असेच यातून दिसते. रस्त्यांची अर्धवट कामे लवकर पूर्ण करावी अशी मागणी जोर धरत आहे. त्यातच परिसरातील विरोधक देखील सुस्त पडल्याची चर्चा आहे.

[ चांगला सुस्थितीत असलेला रस्ता ठेकेदाराने उखडून टाकला…. पिंपळगाव जवळील कापरे- वस्ती येथील रस्त्यांवर कुठेही खड्डे नसताना चांगल्या सुस्थितीत रस्त्यावर पुन्हा दुबार काम काढले असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत. त्यामुळे एकंदरीतच प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाकडे निधी नसल्याचे बोलले जाते. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने चांगल्या रस्त्यावरच दुबार रस्ता करुन जनतेच्या पैशाची उधळपट्टी का केली ? हा प्रकार ठेकेदाराचे व अधिकाऱ्यांचे खिसे भरण्याचा प्रकार असल्याचा आरोप तेथील स्थानिक नागरिक करत आहेत. ]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0