Amit Shah : ‘सामाजिक न्यायाचा सर्वोच्च आदर्श’ – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र वंदन

•’शिक्षा’ (शिक्षण) हा सामाजिक परिवर्तनाचा मूलमंत्र, तर ‘संविधान’ सशक्त भारताचा आधार; शहा यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला.
नवी दिल्ली :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्या कार्याला वंदन करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. अमित शहा यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत, शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे मूळ मंत्र मानणाऱ्या संविधान-शिल्पींनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला.
गृहमंत्री शहा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रमिक, शेतकरी आणि समाजातील दुर्बळ घटकांना त्यांचे अधिकार देऊन सामाजिक न्यायाचा सर्वोच्च आदर्श स्थापित केला.
समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सशक्त भारताचा पाया रचणाऱ्या बाबासाहेबांनी राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक पैलूवर आपली अमिट छाप सोडली आहे. शहा यांनी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना म्हटले आहे की, “सागर-सा विराट त्यांचा व्यक्तित्व आणि हिमालय समान विशाल त्यांचे कार्य प्रत्येक देशवासीयासाठी लोकसेवेचा महान आदर्श आहे.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने डॉ. भीमराव आंबेडकर यांना विनम्र वंदन केले आहे


