मुंबई

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका

Sanjay Raut Target Cm Eknath Shinde And Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे माकडाचा मुलगा…. ते रावणाची औलाद आहे, श्रीकांत शिंदेवर टीका करताना संजय राऊत त्यांची जीभ घसरली

मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत Sanjay यांनी शिंदे पिता पुत्रांवर जोरदार टीका केली आहे. टीका करताना खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. श्रीकांत शिंदे माकडाचा मुलगा आहे. रावणाची औलाद आहेत अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे पिता पुत्रांवर जोरदार टीका केली आहे.

शिंदे पिता पुत्रांवर टीका

संजय राऊत म्हणाले, श्रीकांत शिंदेंची डॉक्टरकिची सर्टिफिकेट तपासा, चोरलेला धनुष्यबाण लोकसभेला छातीवर पडला. ते रावणाची औलाद आहेत”, अशा खालच्या शब्दांत राऊतांनी श्रीकांत शिंदेंवर टीका केली आहे. तसेच श्रीकांत शिंदे माकडाचा मुलगा आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरला आहे. श्रीकांत शिंदे यांची लायकी नसताना, उद्धव ठाकरे यांनी खासदार बनवले. त्यांचे वडील आले, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे नाक रगडले”, असे राऊत म्हणाले.

पुढे राऊत म्हणाले, “श्रीकांत शिंदेंचे वडील माझ्या मुलाकडे काम नाही. तो बेरोजगार आहे. त्याच्याकडे डॉक्टरची डिग्री आहे, पण रूग्णालय चालवता येत नाही. त्याला मेडिकलच ज्ञान नाही असे उद्धव ठाकरेंना म्हणाले होते. श्रीकांत शिंदेंना लाज वाटली पाहिजे”, अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला.

वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्ला पंतप्रधान मोदी यांच्या वन नेशन, वन इलेक्शनच्या घोषणेवरून संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “मोदी लाल किल्ल्यावरून छाती ठोकून वन नेशन, वन इलेक्शनबाबत बोलतात. मात्र चार राज्यातील निवडणुका ते एकत्र घेऊ शकत नाहीत. जे सरकार चार राज्यातील निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन, वन इलेक्शनच्या गोष्टी करून खोटे बोलत आहेत. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये त्यांना पराभवाची भीती आहे. त्यामुळेच या दोन्ही राज्यात निवडणुकांसाठी त्यांना जास्त वेळ पाहिजे आहे. त्यासाठी सणवार किंवा इतर कारणे दिली जात आहेत”, असा आरोप राऊतांनी केला आहे.

सुडाचे राजकारण फडणवीसांनी सुरू केले नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार आले तर सर्व योजना बंद केल्या जातील असे विधान केले आहे. त्यावर संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, हे लोक असे कोण लागून गेले की त्यांच्या योजना आम्ही बंद करू?, आम्ही महाराष्ट्रावर कधी राज्य केले नाही का?, महाराष्ट्रात शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री होते. फडणवीसांनी महाराष्ट्रातील परंपरा समजणे गरजेचे आहे. ही योजना बंद, ती योजना बंद हे सुडाचे राजकारण फडणवीसांनी सुरू केले”, असे राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0