•पिंपरी चिंचवडच्या मेळाव्यात शरद पवारांचा काँग्रेस विचारांशी एकनिष्ठतेचा पुनरुच्चार!
पिंपरी चिंचवड | राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय रणनितीला वेग आला आहे. प्रत्येक पक्ष युती, आघाड्या, आणि अंतर्गत गटांमधील एकत्रिततेवर विचार करत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र यावर ठाम भूमिका घेत भाजपाबरोबर जाणाऱ्यांवर निशाणा साधला.
पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना पवारांनी काँग्रेसच्या विचारधारेची पाठराखण करताना स्पष्ट केलं की, “सगळ्यांना सोबत घेण्याचा आग्रह योग्यच, पण हे सगळे गांधी-नेहरू-फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार मानणारे असले पाहिजेत. केवळ सत्तेसाठी भाजपाच्या मांडीला मांडी लावणारे ‘सगळे’ या व्याख्येत येत नाहीत.”
भूतकाळातील आठवणी सांगताना त्यांनी 1980 सालच्या प्रसंगाचा दाखला देत, “जे सोडून गेले, ते पुन्हा निवडून आले नाहीत,” असं म्हणत गटबाजीच्या चर्चांना अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिलं. अजित पवार गटाशी एकत्र येण्याच्या चर्चांनाही यामुळे अप्रत्यक्ष उत्तर मिळालं असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
पुढे बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत स्पष्ट केले की, “कोण आला-गेला याचा विचार करू नका, लोकशाही सामान्य जनतेच्या शहाणपणावर उभी आहे. आपली नवी नेतृत्ववर्ग घडवण्याची हीच वेळ आहे.”
येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी दिलेले हे विधान पक्षांतर्गत निष्ठा, विचारधारेला प्राधान्य, आणि भाजपाविरोधातील लढ्याची रणनीती अशा तिन्ही पातळ्यांवर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…