नाशिक

Sharad Pawar : ‘आम्ही शेतकऱ्यांचे, शेतकऱ्यांनीच आमचे’; शरद पवारांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये ‘आक्रोश मोर्चा’

Sharad Pawar Latest News : कांदा उत्पादक शेतकरी मोर्चाचे मुख्य आकर्षण; जीपमध्ये कांदे ठेवून सरकारला इशारा

नाशिक :- आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून आज, सोमवारी नाशिकमध्ये पक्षाच्या वतीने ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. ईदगाह मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या या मोर्चाचे मुख्य आकर्षण खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांशी जोडलेली नाळ

राजकारणात आल्यापासून शरद पवार यांनी ग्रामीण भागाशी आणि विशेषतः शेतकऱ्यांशी आपली नाळ कायम ठेवली आहे. त्याचेच दर्शन आज नाशिकमध्ये झाले. ईदगाह मैदानातून निघालेल्या या मोर्चासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. मोर्चात बैलगाडीही आणण्यात आली होती, तर शरद पवार एका खुल्या जीपमधून सहभागी झाले होते. त्यांच्या जीपच्या पुढील भागात ठेवलेले कांदे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते, ज्यातून त्यांनी कांदा उत्पादक शेतकरी हाच आपला खरा आधार असल्याचे दाखवून दिले.

प्रमुख मागण्या

या मोर्चातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या:

विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने कर्जमाफी जाहीर करावी.

कांद्याची मुक्त निर्यात सुरू करावी.

कापसाची आयात थांबवावी.

शेतीमालाला हमभाव द्यावा.

जळगाव जिल्ह्यातील कांदा आणि केळी उत्पादक शेतकरीही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

राजकीय समीकरणे

काही महिन्यांपासून कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. महायुती सरकारविरुद्ध वाढत असलेल्या या नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून केला जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश या मोर्चातून देण्यात आला. या मोर्चाला खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, रोहिणी खडसे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचीही उपस्थिती होती.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago