मुंबई

Sanjay Raut : मविआत नव्या प्रस्तावावरून खळबळ! ‘उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावे, काँग्रेसला राज्यसभा द्यावी’; संजय राऊतांनी स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut On Mahyuti : हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाने जागावाटपाची चर्चा ऐरणीवर | ‘सौ आचारी आणि रस्ता भिकारी’ म्हणत राऊतांचा महायुतीवरही निशाणा

मुंबई :- आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडलेल्या एका विशेष प्रस्तावामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मविआचे प्रमुख नेते म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः विधान परिषदेवर (MLC) जावे, तर राज्यसभेची (Rajya Sabha) जागा काँग्रेसला सोडावी, अशी भूमिका सपकाळ यांनी मांडली. या प्रस्तावामुळे आघाडीत काही प्रमाणात मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू होताच, शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पक्षाची रोखठोक बाजू स्पष्ट केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, आगामी निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाण्याची काँग्रेसची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात सक्रिय व्हावे आणि काँग्रेसला दिल्लीच्या राजकारणात संधी मिळावी, असे समीकरण मांडले. या प्रस्तावावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हा प्रामुख्याने विधिमंडळाचा विषय आहे. कोणाला कोणती जागा द्यायची, हे जेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते एकत्र बसतील, तेव्हाच निश्चित केले जाईल. अद्याप यावर कोणतीही अधिकृत चर्चा किंवा कार्यवाही सुरू झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधिमंडळात सक्रिय व्हावे, ही महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांची इच्छा आहे, असे सांगतानाच राऊत यांनी एक महत्त्वाची अटही घातली. “उद्धवजींची स्वतःची इच्छा काय आहे, याची चाचपणी करणे सर्वात गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. महाविकास आघाडीत लोकशाही असून प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, मात्र अंतिम निर्णय हा तिन्ही पक्षांच्या सहमतीनेच होईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. भाजपमध्ये लोकशाही नाही, तिथे कोणालाही मत मांडता येत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

यावेळी संजय राऊत यांनी महायुतीमधील सध्याच्या परिस्थितीवरही सडकून टीका केली. महायुतीत सध्या ‘सौ आचारी आणि रस्ता भिकारी’ अशी अवस्था झाली असून कोणाचा कोणाला ताळमेळ राहिलेला नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेचा आणि वाक्प्रचारांचा अधिक सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांना चिमटा काढला. या नव्या राजकीय समीकरणामुळे येत्या काळात महाविकास आघाडीतील जागावाटपाची पेच सुटणार की अधिक गुंतागुंतीचा होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

43 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago