मुंबई

Samruddhi Expressway: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून नवीन टोल दर लागू

Samruddhi Expressway: एमएसआरडीसीच्या म्हणण्यानुसार, महामार्गाच्या बांधकामाचा खर्च वसूल करण्यासाठी दर तीन वर्षांनी हायवे टोलचे दर वाढवले जातात. या निर्णयानुसार 1 एप्रिल 2025 पासून टोल दरात वाढ करण्यात आली आहे.

मुंबई :- पुढील महिन्याच्या पहिल्यापासून वाहनचालकांना राज्यातील सर्वाधिक हायटेक महामार्गावरून प्रवास करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. Samruddhi Expressway अधिक पैसे खर्च करण्याचे मुख्य कारण म्हणजे 1 एप्रिलपासून महामार्गांवर नवीन टोल दर लागू करणे.नवीन टोल दरांनुसार, वाहनचालकांना महामार्गावरील प्रत्येक किलोमीटर प्रवासासाठी 33 पैशांपासून ते 2.13 रुपये प्रति किलोमीटरपर्यंत टोल भरावा लागणार आहे. समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा 11 डिसेंबर 2022 रोजी सुरू झाला. तीन वर्षांनंतर महामार्गावरील टोल दरात वाढ करण्यात आली आहे.

आतापर्यंत, कार, जीप किंवा हलकी मोटार वाहनांना महामार्गाच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 1.73 रुपयांपर्यंत टोल भरावा लागत होता, तर पुढील महिन्यापासून कार चालकांना 1.73 रुपयांऐवजी 2.06 रुपयांपर्यंत टोल भरावा लागणार आहे.हलकी व्यावसायिक वाहने आणि मिनी बसेसना 2.79 रुपयांऐवजी 3.32 रुपये प्रति किमी टोल भरावा लागणार आहे. बस आणि ट्रकला 5.85 रुपयांऐवजी 6.97 रुपये टोल भरावा लागणार आहे. जास्त आकाराच्या वाहनांना 13.30 रुपये टोल भरावा लागेल.

मुंबई ते नागपूर दरम्यान 701 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधण्यात आला आहे. सध्या 701 किलोमीटरच्या महामार्गापैकी केवळ 625 किलोमीटरचा रस्ता वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. तर शेवटच्या टप्प्यातील ७६ किमीचा मार्ग लवकरच वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. आतापर्यंत 1.75 कोटींहून अधिक वाहने 625 किलोमीटरच्या महामार्गावरून गेली आहेत.संपूर्ण महामार्ग खुला झाल्यानंतर समृद्धी येथून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

1 एप्रिल पासून नवीन दर

मुंबई – नागपुर – 1444.06 रुपये
मुंबई- शिर्डी – 372.86 रुपये
मुंबई – इंगतपुरी – 156.56 रुपये
नागपुर – शिर्डी – 1071.2 रुपये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
12:30