मुंबई

Sanjay Raut : राजकारण्यांचा ‘न्यायालयीन शनिवार’! राहुल गांधी, संजय राऊत आणि शायना एन.सी. यांच्या प्रकरणांमुळे राज्यातील वातावरण तापले

Bhiwandi Court Latest News : भिवंडीत राहुल गांधींना मिळाला नवा जामीनदार | मालेगावात राऊत-भूसेंचा समेट तर मुंबईत सावंत-शायना वाद न्यायालयात

मुंबई/भिवंडी/मालेगाव l राज्याच्या राजकीय इतिहासात आजचा शनिवार ‘न्यायालयीन घडामोडींचा दिवस’ म्हणून ओळखला जाईल. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या शहरांतील न्यायालयांमध्ये दिग्गज राजकीय नेत्यांची उपस्थिती आणि मानहानीच्या खटल्यांवरील सुनावणीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एन.सी. या तिन्ही प्रमुख व्यक्ती आज न्यायालयाच्या पायऱ्या चढल्याने माध्यमांचे लक्ष या घडामोडींकडे लागले होते.

भिवंडी न्यायालयात आज राहुल गांधी यांची महत्त्वाची उपस्थिती राहिली. 2014 मधील एका प्रचार सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या विधानावरून त्यांच्यावर मानहानीचा खटला सुरू आहे. या प्रकरणात त्यांचे पूर्वीचे जामीनदार माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने आज नवीन जामीनदार सादर करण्याची प्रक्रिया पार पडली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधींचे जामीनदार म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि न्यायालयाने तसे आदेश मंजूर केले. यामुळे या खटल्याच्या पुढील सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दुसरीकडे, मालेगाव न्यायालयात मात्र संघर्षाऐवजी सामोपचाराचे चित्र पाहायला मिळाले. मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल केलेला 178 कोटींच्या कथित घोटाळ्याचा अब्रुनुकसानीचा खटला मागे घेतला. दोन्ही नेते आज न्यायालयात एकत्र हजर झाले आणि त्यांनी जुन्या मैत्रीची ग्वाही देत वादावर पडदा टाकला. संजय राऊत यांनी चुकीच्या माहितीमुळे हा गैरसमज झाल्याचे मान्य करत दिलगिरी व्यक्त केली, तर भुसे यांनीही शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि राऊतांच्या तब्येतीचा विचार करून हा खटला मागे घेत असल्याचे जाहीर केले. या अनपेक्षित समेटामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

त्याच वेळी मुंबईतील माझगाव न्यायालयात ‘इंपोर्टेड माल’ या वादग्रस्त विधानावरून सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी पार पडली. विधानसभा निवडणुकीदरम्यान खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आपला अपमान झाल्याचा दावा करत शायना एन.सी. यांनी तक्रार दाखल केली आहे. आज न्यायालयात शायना एन.सी. यांची साक्ष नोंदवण्यात आली असून, त्यांनी सावंत यांच्यावर विनयभंग आणि मानहानीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 16 मार्च रोजी होणार आहे. अशा प्रकारे, एकाच दिवशी राज्यातील तीन वेगवेगळ्या टोकांवर चाललेल्या या कायदेशीर लढाईमुळे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago