Rohit Pawar On Maharashtra Sarkar : ‘2200 कोटींची मदत जून-ऑगस्टमधील नुकसानीची’; सप्टेंबरसाठी तातडीची मदत नाही
मुंबई :- राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीवर राज्य सरकारने केलेल्या मदतीच्या घोषणांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. ‘ही ओल्या दुष्काळात कोरड्या आणि खोट्या घोषणा’ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केलेली 2,215 कोटींच्या मदतीची घोषणा फसवी असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला.
मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा
रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “‘पहिल्यांदाच आपत्ती सुरू असतानाच आम्ही पैसे रिलीज करणे सुरू केले आहे,’ ही मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया पूर्णतः खोटी आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री जे 2,200 कोटी रुपये रिलीज केल्याचे सांगत आहेत, ती रक्कम प्रत्यक्षात जून-ऑगस्ट महिन्यातील नुकसानीची भरपाई आहे. दोन महिने उलटून गेल्यानंतर ही मदत आता मिळत आहे. त्यामुळे सध्याच्या, म्हणजेच सप्टेंबरमधील नुकसानीसाठी सरकारकडून कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही.
तातडीची मदतही नाही
रोहित पवार यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला आहे की, “सप्टेंबरमधील नुकसानीसाठी तातडीची मदत सोडाच, पण कपडे, भांडी, अन्नधान्य यांसारख्या वस्तूंसाठीदेखील कोणताही जीआर (शासकीय निर्णय) निघालेला नाही.”
त्यांनी सरकारला आव्हान दिले आहे की, सरकारने तात्काळ तातडीची मदत देऊन शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी. तसेच, सरकार ओला दुष्काळ का जाहीर करत नाही, याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…