महाराष्ट्र

Raj Thackeray: महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी शरद पवारांनी…. राज ठाकरे

Raj Thackeray On Sharad Pawar : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर, मणिपूरच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांची शरद पवार वर टीका

सोलापूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी शरद पवार Sharad Pawar यांना टोला लावला आहे. महाराष्ट्राचा मनिपुर करण्यासाठी शरद पवारांनी हातभार लावणे असे राज ठाकरे यांनी म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी भीती व्यक्त करत महाराष्ट्राची आगामी काळात मणिपूर Manipur सारखी परिस्थिती होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यावर राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर असून ,शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत नेमकं काही समजत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले. Maharashtra political Latest News

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी आरक्षणासह राज्यातील जातीपातीच्या राजकारणावरही भाष्य केलं. “महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळाली पाहिजे, यात जात येते कुठं. महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होतात. खासगी शिक्षण संस्था आणि नोकऱ्यात आरक्षण नाही. मग किती जागांवर आरक्षण आहे. हे बघणंही गरजेचं आहे. मुळात सध्या माथी भडकवून राजकारण करण्याचं प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. हे फक्त मतांचं राजकारण आहे. प्रत्येकाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. यातून हाताला काहीही लागणार नाही”, असे ते म्हणाले. Maharashtra political Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0