मुंबई

Rain Update : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम; प्रशासन सतर्क, नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन

Mumbai Rain Latest Updates : ठाणे, रायगड, कोकणातील जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात,पावसामुळे रेल्वे वाहतूक, रस्ते सेवा प्रभावित; सुरक्षिततेसाठी शासनाची सर्व यंत्रणा सज्ज

मुंबई :- महाराष्ट्रात जोरदार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून, मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सलग काही तास मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून, विशेषतः सखल भागांमध्ये पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आणि तातडीने मदत कार्य सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. Mumbai Rain Latest Updates

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचा तसेच इतर प्रभावित भागांचा आढावा घेतला. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी संपर्क साधत बचाव कार्याची तयारी तपासली. “जनतेचे नुकसान होऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असाव्यात. पाण्याने भरलेले रस्ते, विजेच्या तारा, धोकादायक इमारती यांकडे विशेष लक्ष द्यावे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

तसेच, उपमुख्यमंत्री यांनी नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. “प्रशासन मदतीसाठी तत्पर आहे, पण नागरिकांचे सहकार्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले. सध्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक येथे पावसाचा जोर अधिक आहे, आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने विशेष उपाययोजना राबविल्या आहेत.

vivek

Recent Posts