Categories: Uncategorized

Rahul Gandhi : शिवरायांचे विचार भाजपला मान्य नाही, काही दिवसातच पुतळा कोसळला…कोल्हापुरात राहुल गांधींचा हल्लाबोल

Kolhapur Chhatrapati Shivaji Maharaj Statue Inauguration: कोल्हापुरात काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, आज विचारधारेची लढाई आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांनी लढवली होती. भाजपचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर विश्वास नाही. हे लोक 24 तास विचारधारेच्या विरोधात काम करतात. आमचा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे.

कोल्हापूर :- काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या हस्ते शनिवारी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. Kolhapur Chhatrapati Shivaji Maharaj Statue Inauguration यावेळी ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा केवळ पुतळा नसून एक विचारधारा आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या विचारसरणीला आणि त्याच्या कृतीला मनापासून पाठिंबा देतो तेव्हा एक मूर्ती तयार होते. पण भाजपला शिवरायांचे विचार मान्य नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करताना आपणही शपथ घेतली पाहिजे की, छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रकारे आयुष्य जगले आणि ज्या गोष्टींसाठी लढले, त्या गोष्टींसाठीही आपण लढले पाहिजे. आज ही विचारधारेची लढाई आहे जी महाराजांनी लढली. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला.ते म्हणाले की, भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला पण तो काही दिवसांनी कोसळला.

भाजप छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा मानत नाही. हे लोक 24 तास विचारधारेच्या विरोधात काम करतात. आमचा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे. आमचा लढा विचारधारेचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई लढली आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली. आम्ही त्यांच्या मार्गावर चालत राहू आणि लोकांच्या ‘न्याय हक्कासाठी’ लढत राहू.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago