मुंबई

Narayan Rane : “मी राजकीय संन्यास घेतलेला नाही!”; प्रकृती बिघडल्यानंतर नारायण राणेंचे मोठे स्पष्टीकरण; निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम

Narayan Rane Health Update : लो ब्लड प्रेशर आणि हाय शुगरमुळे आली होती भोवळ; सिंधुदुर्गातील ‘त्या’ विधानाचा राणेंनी सांगितला खरा अर्थ

चिपळूण | भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. “मी निवृत्त होतोय असं कधीच म्हणालो नाही, माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला गेला,” असे स्पष्टीकरण देत त्यांनी आपल्या विरोधकांना उत्तर दिले आहे. चिपळूण येथील कृषी महोत्सवात प्रकृती बिघडल्यानंतर राणेंनी आज माध्यमांशी संवाद साधला.

प्रकृतीबाबत दिली माहिती

चिपळूणमधील भाषणादरम्यान चक्कर आल्याच्या घटनेवर बोलताना राणे म्हणाले की, “भाषणाच्या वेळी माझे ब्लड प्रेशर (BP) लो झाले होते आणि साखरेचे प्रमाण (Diabetes Sugar) 325 च्या वर गेले होते. त्यामुळे मला अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर आली होती. पण आता मी पूर्णपणे ठीक आहे.” कालच्या घटनेनंतर राणे तातडीने विश्रामगृहाकडे रवाना झाले होते, ज्यामुळे समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

निवृत्तीच्या विधानावर स्पष्टीकरण
सिंधुदुर्गातील सभेत “आता थांबायला हवे” असे जे विधान राणेंनी केले होते, त्याचा खुलासा करताना ते म्हणाले:

पदाचा उपयोग जनतेसाठी: “जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल किंवा काही लोक तो होऊ देत नसतील, तर मी अशा राजकारणाला पूर्णविराम देईल, असे मी म्हटले होते.”

कामाचा निकाल महत्त्वाचा: “जर मी माझ्या कामाचा रिझल्ट देऊ शकलो नाही, तर त्या पदाचा उपयोग काय? याचा अर्थ असा नाही की मी राजकारणातून संन्यास घेतोय.”

काय म्हणाले होते राणे?

सिंधुदुर्गात बोलताना राणे भावूक झाले होते. “राजकारणात कट-कारस्थाने केली जात आहेत. त्यामुळे आता मी ठरवलंय घरी बसायचं. मुलांना सांगेन नांदा सौख्य भरे…” असे विधान त्यांनी केले होते. या विधानामुळे राणे राजकारणातून निवृत्त होणार अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. मात्र, आजच्या स्पष्टीकरणामुळे राणे पुन्हा एकदा जोमाने राजकीय मैदानात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विरोधकांना टोला

माणुसकी हाच आपला धर्म असल्याचे सांगताना त्यांनी काळ्या काचेच्या गाड्यांमधून फिरणाऱ्या आणि आडकाठी आणणाऱ्या नेत्यांवरही टीका केली. “मी आजही रस्त्यावर उतरून भाजी घेतो, सर्वसामान्य जनतेत मिसळतो,” असे म्हणत त्यांनी आपली जनसंपर्काची नाळ तुटली नसल्याचे दाखवून दिले.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago