देश-विदेश

Nana Patole : नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे का? मी अद्याप राजीनामा….

 Nana Patole to resign : नाना पटोले यांच्याबाबत अनेक प्रसारमाध्यमांतून त्यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा दावा करण्यात आला होता., नाना पटोले दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घेणार भेटीला

ANI :- महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी पदाचा राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्यक्षात त्यांच्या राजीनाम्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पसरली होती. त्यावर त्यांनी चित्र स्पष्ट केले आहे. पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी नाना पटोले दिल्लीत आले होते. प्रसारमाध्यमांनी त्यांना राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “मी फक्त अध्यक्षांना भेटायला जात आहे, मी कोणताही राजीनामा सादर केलेला नाही. तुम्हाला कोणी सांगितले?”असा प्रश्न नाना पटले यांनी माध्यमांना विचारला आहे. काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीच्या पराभवानंतर नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या मागील दोन दिवसांपासून माध्यमांवर फिरत असताना नाना पटोले यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

साकोली मतदारसंघातून नाना पटोले विजयी झाले. मात्र, त्यांच्या विजयाचे अंतर खूपच कमी होते. त्यांना केवळ 208 मतांनी यश मिळाले. पटोले यांना एकूण 96795 मते मिळाली. भाजपचे अविनाश ब्राह्मणकर 96587 मते घेऊन दुसऱ्या स्थानावर आहेत.288 जागा असलेल्या महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी खराब होती. पक्षाला केवळ 16 जागा मिळाल्या. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दिग्गज नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago