CM Devendra Fadnavis : “झूठ बोले कौवा काटे…” म्हणत मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना उपरोधिक टोला; काँग्रेसच्या विजयांचा दाखलाही दिला

CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi : “मतदार वाढीचं गणित की निवडणुकीचं जंजाळ?” — राहुल गांधींचे आरोप, फडणवीसांचा पलटवार
मुंबई | राज्याच्या राजकारणात सध्या मतदार वाढीच्या आकड्यांवरून आरोप-प्रत्यारोपांचं वादळ उठलं आहे.CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेत सुसंगती नसल्याचा आरोप करत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवरून (एक्स) केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-मध्य नागपूर मतदारसंघात फक्त पाच महिन्यांत तब्बल 8% मतदारांची वाढ झाल्याचा दावा केला. इतकंच नाही, तर काही निवडणूक केंद्रांवर 20 ते 50% पर्यंत मतदारांची अचानक नोंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.
याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,
झूठ बोले कौवा काटे
काले कौवे से डरियो……
राहुल गांधी,
तुमच्या महाराष्ट्राच्या पराभवाची व्यथा दिवसेंदिवस वाढत चालली आहे हे मान्य आहे.
पण किती दिवस हवेत बाण मारत राहणार?
तसं तर महाराष्ट्रात 25 पेक्षा जास्त निवडणूक क्षेत्र आहेत जिथे लोकसभा आणि विधानसभा दरम्यान 8% पेक्षा जास्त मतदार वाढले आहेत आणि काँग्रेसने अनेक जागा जिंकली आहेत.
माझ्या दक्षिण-पश्चिम क्षेत्रास लागलेली पश्चिम नागपूर निवडणूक क्षेत्रात 7% मतदार (27,065) वाढले आणि तिथे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी निवडणूक जिंकली.
उत्तर नागपुरात 7 टक्के (29,348) मतदार वाढले तर काँग्रेसमधून नितीन राऊत विजयी.
पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मध्ये 10%(50,911) मतदार वाढले व शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी,
मालाड पश्चिम मध्ये 11% (38,625) मतदार वाढले आणि आपला काँग्रेस पक्ष असलम शेख विजयी.
मुंब्र्यात 9 टक्के (46,041) मतदार वाढले तर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी.
मित्र पक्षांकडून चांगले नाही,
पण या ट्वीटच्या आधी असलम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊत सारख्या जुन्या सहकाऱ्यांशी एकदा बोलले असते तर बरं झालं असतं.
संवाद अभावी एवढं वाईट प्रात्यक्षिक तरी काँग्रेस कडे नाही…


