Mumbai Police Latest News : एका विशेष मोहिमेत हरवलेले आणि चोरीला गेलेले फोन 15 दिवसांत हस्तगत
मुंबई :- मुंबई पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल परत मिळवून देण्याच्या मोहिमेत एक मोठी यशस्वी कामगिरी केली आहे. गेल्या 15 दिवसांत राबवलेल्या एका विशेष मोहिमेत पोलिसांनी तब्बल 56 लाख 30 हजार 895 रुपये किमतीचे 347 मोबाईल हस्तगत केले आहेत. आज एका विशेष कार्यक्रमात हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले, ज्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्ट दिसत होते.
पोलीस उपायुक्त, परिमंडळ-4,रागसुधा आर. यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत परिमंडळातील प्रत्येक पोलीस ठाण्याची पथके तयार करून 2022 ते 2025 या कालावधीत हरवलेल्या मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेण्यात आला. या प्रयत्नांमुळे मुंबई, महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून मोबाईलचा शोध घेऊन ते परत मिळवणे शक्य झाले.
गुन्ह्यांची आकडेवारी
2022 : 48 मोबाईल
2023 : 34 मोबाईल
2024 : 96 मोबाईल
2025 : 169 मोबाईल
कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण आणि अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली. या मोहिमेमुळे केवळ गुन्हेगारांवर वचक बसला नाही, तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वासही अधिक दृढ झाला आहे. हरवलेल्या वस्तू परत मिळतील, या आशेवर असलेल्या अनेकांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…