क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Crime News : मुंबईत 10 रुपयांच्या भाड्यावरून वाद, रिक्षाचालकावर चाकू हल्ला

Mumbai Powai Crime News : या घटनेनंतर रिक्षाचालकाने जवळच्याच पवई पोलिसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पवई पोलिसांनी रविवारी आरोपीला अटक केली.

मुंबई :- मुंबईतील पवई परिसरात अवघ्या 10 रुपयांवरून झालेल्या किरकोळ वादाला हिंसक वळण लागले. Mumbai Powai Crime News वाद सुरू असताना एका व्यक्तीने रिक्षाचालकावर चाकूने हल्ला करून जखमी केले.दहा रुपयांच्या भाड्यावरून झालेल्या वादातून अवधेश सरोज याने रिक्षाचालक शाहनवाज शेख यांच्यावर चाकूने हल्ला केला. शाहनवाज शेअरिंग रिक्षा चालवतात आणि प्रत्येक प्रवाशामागे 30 रुपये आकारतात.

आरोपी अवधेश सरोज हा त्याचा भाऊ आणि तीन मुले यांच्यासह रिक्षाचालकाने 90 रुपये भाडे देण्यास सांगितले.त्यावर आरोपी सरोजने एकूण खर्चावर आक्षेप घेत पूर्ण भाडे देण्यास नकार दिला. त्याने 10 रुपयांची सूट मागितली आणि 80 रुपयेच देण्याचा आग्रह धरला. शेख याने 80 रुपये घेण्यास नकार दिल्याने या मुद्द्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

यानंतर अवधेश सरोज याने रिक्षाचालक शाहनवाज शेख याच्यावर चाकूने हल्ला केला, तर त्याचा भाऊ पवन सरोज याने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर रिक्षाचालकाने जवळच्याच पवई पोलिसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पवई पोलिसांनी अवधेश सरोजला या घटनेच्या दोन दिवसांनंतर रविवारी (2 मार्च) अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची सुरुवात एका छोट्याशा प्रकरणावरून झाली आहे. शेख यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अवधेशविरुद्ध चाकू हल्ल्याचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे. या घटनेने परिसरात भाड्यावरून होणाऱ्या मारामारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0