Monsoon session of Maharashtra Assembly : पावसाळी अधिवेशनाचे रणसंग्राम! 30 जूनपासून विधानभवनात राजकीय चकमकींचा हंगाम सुरू

Monsoon session of Maharashtra Assembly : हिंदी सक्ती, कर्जमाफी, मतदारांवरील आरोपांवरून सरकारला विरोधकांचा कडवा घेराव
मुंबई | महाराष्ट्र विधानमंडळाचे बहुचर्चित पावसाळी अधिवेशन Monsoon session of Maharashtra Assembly 30 जूनपासून 18 जुलै 2025 पर्यंत मुंबईत पार पडणार आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतरचा हा सर्वात प्रदीर्घ आणि महत्त्वाचा अधिवेशन कालावधी असणार असून, यामध्ये विविध संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या वादग्रस्त मुद्द्यांवर घमासान होण्याची शक्यता आहे.
विधानभवनात नुकतीच पार पडलेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या अधिवेशनाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
या अधिवेशनात हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पातील कथित विस्थापन, शेतकरी कर्जमाफीची अद्यापही प्रतीक्षेत असलेली घोषणा आणि निवडणूक मतदारांवरील आरोप हे मुद्दे विरोधकांच्या निशाण्यावर राहणार आहेत. यामुळे अधिवेशनात सरकारला अपार दबावाला सामोरे जावे लागण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षांचे नेते या अधिवेशनात सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आवाज देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे यंदाचे अधिवेशन हिवाळीपेक्षा अधिक वादळी ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.



