मुंबई

MNS On Toll : मुंबईकर टोल मुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाबार्‍यापैकी यश आले! मनसे प्रमुख राज ठाकरे

•ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी ठाणे टोल नाक्यावर कारचालकांना वाटले लाडू

मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईकरांसाठी तसेच वाहनचालकांसाठी एक अत्यंत आनंदाचा निर्णय घेतला आहे. हलक्या वाहनांना मुक्त करण्यात आले असून आजपासून कोणत्याही प्रकारे टोल वसुली केली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वाशी, ऐरोली, मुलुंड, दहिसर आणि आनंदनगर टोलनाक्यावर हलक्या वाहनांकडून कर वसुली केली जाणार नाही. या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुंबईकर टोल मुक्त झाला आहे याचा आनंद व्यक्त केला आहे तसेच आमच्या आंदोलन बऱ्यापैकी यश आले आहे असा उल्लेख करत राज ठाकरे यांनी एम एम आर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या अभिनंदन तसेच महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचे हि अभिनंदन केले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्याच्या शिल्लेदार अविनाश जाधव यांनी ठाणे टोलनाक्यावर लाडू वाटून आनंद व्यक्त केला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन.

टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला… आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही.

पण असो… किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी.

आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले.

महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0