Mumbai Latest Rain Update : क्रांतीनगर आणि संदेशनगर येथील नागरिकांचे स्थलांतर सुरू; एनडीआरएफ आणि पालिका पथके सज्ज
मुंबई :- मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीतील पाण्याची पातळी धोकादायक पातळीच्या जवळ पोहोचली आहे. नदीची धोकादायक पातळी 3.40 मीटर असून, मंगळवारी ती 3.10 मीटरवर पोहोचल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
विहार तलाव भरल्याने धोका वाढला
सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवईतील विहार तलाव पूर्ण भरून वाहू लागला आहे. यामुळे मिठी नदीतील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिठी नदीतील पाणी पातळी लवकरच 3.40 मीटरची धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. यामुळे वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) आणि वांद्रे परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
नागरिकांचे स्थलांतर सुरू
संभाव्य धोका टाळण्यासाठी, मिठी नदीच्या काठावर असलेल्या क्रांतीनगर आणि संदेशनगर येथील सुमारे 140 कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) आणि पालिकेची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. या कुटुंबांना जवळच्या मगनलाल नथूराम शाळेत हलवण्यात येत असून, त्यांच्या खाण्या-पिण्याची सोयही करण्यात आल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…