बीड :- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आता मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे. 27 ऑगस्टला गणपती बाप्पाच्या आगमनाच्याच दिवशी जालन्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार असून, ‘गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनासाठी राज्यातील सर्व मराठ्यांनी कामधंदे आणि व्यवसाय बंद ठेवून मुंबईत यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनामागच्या मुख्य मागण्या आणि पुढील रणनीती स्पष्ट केली. गेल्या 13 महिन्यांपासून सरकार फक्त अभ्यास करत आहे, त्यामुळे आता प्रत्यक्ष मैदानात उतरून आरक्षण मिळवायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या पाच प्रमुख मागण्या
आंदोलनाचा मार्ग
जरांगे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि मुंबईतील आंदोलनाच्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…