Maharashtra Politics : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का, दोन जवळचे सहकारी अजित पवार गटात

•राजकारणात पक्ष बदलण्याचा खेळ अजूनही सुरू आहे. यावेळी जितेंद्र आव्हाडांचे दोन जवळचे सहकारी अजित पवार यांच्या गोटात सामील झाले.
मुंबई :- महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी (18 फेब्रुवारी) आव्हाड यांचे निकटवर्तीय अभिजीत पवार आणि हेमंत वाणी अजित पवार यांच्या गटात सामील झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व बहाल केले. अभिजीत आणि हेमंत गेल्या अनेक वर्षांपासून जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम करत होते.


महिला विकास मंडळाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोघांनाही पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. अभिजीत आणि हेमंत हे जितेंद्र आव्हाड यांचे सर्वात विश्वासू आणि कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांच्या प्रवेशामुळे ठाणे शहर आणि मुंब्रा येथील आव्हाड यांच्या पकडीवर परिणाम होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या एक्स वर पोस्ट करत म्हणाले की,आज ठाणे आणि धुळे येथील अन्य पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. श्री. अभिजित पवार, श्री. हेमंत वाणी, श्रीम. सीमा वाणी यांसह अनेक मान्यवरांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या आदर्श विचारांशी एकरूप होण्याचा, पक्षाच्या जनकल्याणाच्या कार्यात स्वतःला वाहून घेण्याचा निर्धार केला. मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
विधानसभा निवडणुकीत आपल्या काकांच्या पक्षाचा पराभव केल्यानंतर अजित पवार संघटनेचा विस्तार आणि बळकटीकरणाकडे लक्ष देत आहेत. अशा स्थितीत भविष्यात त्यांना यश मिळावा यासाठी पक्षात सामावून घेतले जात आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अजित पवार यांचे मनोबल उंचावले आहे.