Maharashtra Politics : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडीचा निषेध, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरवर चप्पल मारली

•महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया असा पायी मोर्चा काढला. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी झाले होते.
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत एकत्र येत सरकारचा तीव्र निषेध केला. त्याला जोडे मारो आंदोलन असे नाव देण्यात आले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया असा पायी मोर्चा काढला. यात शिवसेना(ठाकरे)प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह घटक पक्षांचे अनेक बडे नेते सहभागी झाले होते.

या मोर्चादरम्यान, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह अनेक महाविकास आघाडी नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पोस्टरवर चप्पल आणि शूज मारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माफीनाम्याबाबत नेत्यांनी आरोप केला की, त्यांच्या माफीत अहंकार भरलेला आहे. दरम्यान, पुतळा कोसळणे हे भ्रष्टाचाराचे उदाहरण असल्याचे शरद पवार म्हणाले.
घटनेच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया पर्यंत पायी मोर्चा काढला. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, त्यांची तब्येत बरी नाही, तरीही मोर्चात सहभागी झालो. त्याचवेळी हुतात्मा चौकाजवळ महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे म्हणाले, “”छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची शान आणि आत्मा आहेत. या घटनेने आत्मा आणि अभिमान दुखावला आहे. आमचा निषेध मोर्चा हा लोकशाहीचा भाग आहे.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार करत विरोधक या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, “जनता हे पाहत आहे. येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता त्यांना जोडे मारेल.