•कोकण आणि विदर्भात ‘यलो अलर्ट’, रत्नागिरी-सिंधुदुर्गात 14 ऑगस्टला जोरदार पाऊस अपेक्षित
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिली होती, त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, आता हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. बुधवार, 13 ऑगस्टपासून मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे 12 ते 14 ऑगस्टदरम्यान विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. 14 ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’
विदर्भातील गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी 13 आणि 14 ऑगस्ट रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यामुळे या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…