मुंबई

Mumbai Crime News : सोने-चांदीच्या व्यापाऱ्याच्या चोरी प्रकरणात चार दरोडेखोरांना न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली

•तब्बल 6569.50 ग्रॅम वजनाचे अंदाजे 1 कोटी 78 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी केले होते लंपास!

मुंबई :- मुंबई सत्र न्यायालयाने एका व्यापाऱ्याला लक्ष्य करून केलेल्या सोन्याच्या चोरीच्या प्रकरणात सहभागी असलेल्या चार दरोडेखोरांना 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.तक्रारदार मुकेश कुमार रतनचंद संघवी (46 वय),17 सप्टेंबर 2016 रोजी सोने आणि चांदीचे व्यापारी, त्यांच्या कर्मचाऱ्यांसह आणि पुतण्यासोबत टॅक्सीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला प्रवास करत होते. ते राजस्थानला नेण्यासाठी 6569.50 ग्रॅम वजनाचे अंदाजे 1 कोटी 78 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन जात होते.

कार्नाक बंदर ब्रिजवरील सुलभ शौचालयाजवळ टॅक्सी थांबली असता, चालकाने ब्रेक घेण्याचे नाटक केले, त्यावेळी आरोपीने संघवी यांना जबरदस्तीने गाडीतून बाहेर काढले, त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. दरम्यान, साथीदारांनी त्यांचे कर्मचारी आणि पुतण्या यांचे अपहरण केले आणि टॅक्सीमध्ये सोन्याने भरलेली बॅग घेऊन पळून गेले. नंतर त्यांनी ओलिसांना पी. डी’मेलो रोडवर सोडून दिले आणि नंतर गाडी घेऊन पळून गेले. पायधुनी पोलिसांनी 2016 मध्ये आयपीसीच्या कलम 395 आणि 363 अंतर्गत तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-2 ने गुन्हेगारांचा शोध घेताना पोलिसांना सोन्याचे बॅग घेऊन पळणारे आरोपींबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे, प्रफुल्ल रामचंद्र गायकवाड, शहानवाज बहूद्दीन खान, जहांगीर अब्दुल मलिक शेख आणि रतनकुमार श्यामनाथ सिंग या चार आरोपींना राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी त्यांच्याकडून 1 कोटी 75 लाख 38 हजार 127 रुपयांचे 6.273 ग्रॅम चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0