Mumbai Crime News : अपहरण, खून आणि पुरावा नष्ट करणाऱ्या नराधमाचा ॲन्टॉप हिल पोलिसांनी काटेकोर शोध घेऊन पर्दाफाश

Mumbai Police Latest Crime News : तांत्रिक कौशल्य, 162 सीसीटीव्ही तपास, 10 विशेष पथकांची मेहनत आणि लोअर परळवर थरारक अटक
मुंबई | अत्यंत क्रूर पद्धतीने तीन वर्षांच्या निष्पाप बालिकेचे अपहरण करून खून करणाऱ्या नराधमाला अवघ्या 12 तासांत ॲन्टॉप हिल पोलिसांनी Mumbai Antop Hill Police News जेरबंद करत मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेचा प्रत्यय दिला. तांत्रिक विश्लेषण, 162 सीसीटीव्ही फुटेज तपास आणि 10 विशेष पथकांच्या समन्वयातून ही कारवाई पार पडली. Mumbai Latest Crime News
14 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एका तीन वर्षांच्या बालिकेचे अपहरण केले. फिर्यादी नाजीय शेख (40 वय) यांनी ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 15 जुलै रोजी सकाळी कुलाबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बालिकेचा मृतदेह आढळून आला. शवविचारणीनंतर तीच बालिका असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यात भारतीय दंड विधानातील कलम 103,140(2),238 तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत कलम 75 ची भर करण्यात आली.
या गंभीर प्रकरणाचा तपास करताना पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-4) रागसुधा आर., सहाय्यक पोलीस आयुक्त (सायन विभाग) शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली 10 शोध पथकांची स्थापना करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक केशवकुमार कसार, पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले, पोलीस निरीक्षक किशोरकुमार राजपूत, महिला पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने, प्रदिप पाटील, आण्णासाहेब कदम, कांबळे, निगुडकर यांच्यासह तांत्रिक पथकाने आरोपीचा मागोवा घेतला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक केशवकुमार कसार, पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले, पोलीस निरीक्षक किशोरकुमार राजपूत, महिला पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने, प्रदिप पाटील, आण्णासाहेब कदम, कांबळे, निगुडकर यांच्यासह तांत्रिक पथकाने आरोपीचा मागोवा घेतला.
आरोपी हा मुंबई आणि ठाणे परिसरात सतत ठिकाण बदलून लपून फिरत होता. परंतु पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने त्याचा मागोवा घेतला. अखेर लोअर परळ येथील वरळी नाका बस स्थानकावरून आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीने सांगितले की, मयत बालिका ही त्याच्या वैवाहिक जीवनात अडथळा ठरत होती. त्यामुळेच त्याने रागाच्या भरात तिचे अपहरण करून भाऊचा धक्का, मुंबई येथे नेले आणि गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह समुद्रात फेकून दिला.



