Jitendra Awhad News : अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांना हातकड्या घालून परत पाठवण्यात आले, या निषेधार्थ राष्ट्रवादी-एससीपी नेते जितेंद्र आव्हाडही हातात हातकड्या घालून बाहेर आले. ते म्हणाले की, अमेरिकेत आपल्या भारतीयांना अन्यायकारक वागणूक दिली जात आहे.
मुंबई :- राष्ट्रवादी-एससीपी नेते जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad हातकड्या घालून बाहेर फिरताना दिसले. पत्रकारांनी हातकड्या घालण्याचे कारण विचारले असता ते म्हणाले की, अमेरिकेतून भारतीयांना अशा प्रकारे हातकड्या घालून पाठवले जाते.स्थलांतरितांच्या हद्दपारीच्या विरोधात माझा निषेध नोंदवण्यासाठी मी हातकड्या घालून बाहेर आलो आहे. ते म्हणाले की, अमेरिकेत आपल्या भारतीयांना अन्यायकारक वागणूक दिली जात आहे.राज्यात व देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असून, त्याचा निषेध करण्यासाठी आपण हातात बेड्या घालून येथे आल्याचे ते या प्रकरणी म्हणाले.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. ते चिरडले जात आहे. व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत. या बेड्या या अत्याचाराचे प्रतिक आहेत. ही पद्धत चुकीची आहे. व्यक्त होणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. राईट टू एक्सप्रेशन व राईट टू स्पिच हे आमचे मुलभूत अधिकार आहेत. हे मुलभूत अधिकार शाबूत राहावेत यासाठी या बेड्या मी घातल्या आहेत.
बेड्या धनंजय मुंडे यांना घालाव्यात का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना केला. त्यावर ते म्हणाले, या बेड्या कुणाला घालायच्या हे सरकारच्या मनावर आहे. पण सरकार असे काही करेल असे मला वाटत नाही. त्यांनी खून केलेला नाही हे मी पूर्वीपासूनच सांगत आहे. पण जसे वल्लभभाई पटेल यांनी सांगितले की, गांधी हत्या ही नथुराम गोडसेने केली, पण विचार कुणाचे होते हा प्रश्न त्यांनी विचारला होता. तसे हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झाला आहे. वाल्मीक कराड हाच आरोपी आहे. तोच सूत्रधार आहे.
आम्ही पहिल्या दिवसापासून हेच बोंबलून सांगत होतो. आता सीआयडीने सर्वच पुढे आणले आहे. पण तो माझा खास माणूस आहे असे कोण म्हणाले होते? मग नैतिकता आहे की नाही? तुमचा खास माणूस असा निर्दयी, क्रूर व पाषाणहृदयी असेल तर करायचे काय? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी उपस्थित केला.
ज्या पद्धतीने त्याला हातकड्या घालून आणण्यात आले, त्यामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ते म्हणाले की, अमेरिकेत भारतीयांवर अन्याय होत आहे.त्यांना बांधून भारतात परत पाठवले जात आहे. येथे व्हिसाची समस्या आहे. अमेरिकेत एकही भारतीय सुरक्षित नाही. भारतीयांना खूप त्रास होत आहे, पण सरकार अमेरिकेबद्दल एक शब्दही बोलत नाही.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…