Jalna Accident News : जालना येथे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख पटली आहे. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना :- जिल्ह्यात भरधाव ट्रकने पादचाऱ्यांना धडक दिली आणि या घटनेत एका सहा वर्षीय मुलीसह तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक बालक जखमी झाला. (Jalna Accident News) पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.
जालना शहरापासून 65 किमी अंतरावर असलेल्या मंठा (Mantha) गावात सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. सीमा चव्हाण (34 वर्ष), रामचंद्र राठोड (60 वर्ष) आणि मारिया पठाण (6 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने (Eicher Truck) पादचाऱ्यांना धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले. Jalna Accident News
चव्हाण आणि पठाण यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले, तर राठोड यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात प्राण गमावलेली सीमा यांची चार वर्षांची मुलगी रसिका चव्हाण गंभीर जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. Jalna Accident News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…