
India’s 77 Republic Day Celebration : जनशक्तीचा सोहळा: ७७ वर्षांचा गौरवशाली प्रवास
मुंबई :- भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील 26 जानेवारी हा केवळ एक दिवस नसून, तो प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेचा आणि अधिकारांचा उत्सव आहे. Republic Day Celebration 1950 साली याच दिवशी आपण ‘लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी’ चालवलेले राज्य खऱ्या अर्थाने स्वीकारले. आज जेव्हा आपण प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करतो, तेव्हा तो केवळ संचलनाचा किंवा झेंडावंदनाचा कार्यक्रम न राहता, आपल्या संविधानातील मूल्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा क्षण ठरला पाहिजे.
संविधान: आपली कवचकुंडले
भारताचे संविधान हे केवळ जगातील सर्वात मोठे लिखित दस्तऐवज नाही, तर तो आपल्या राष्ट्रजीवनाचा आत्मा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानाने शेवटच्या रांगेतील माणसालाही मतदानाचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांतून सुरू होणारी उद्देशिका आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार खांबांवर उभे राहण्याची प्रेरणा देते.
आव्हाने आणि संधी
गेल्या सात दशकांत भारताने कृषी, अंतराळ, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेत मोठी झेप घेतली आहे. मात्र, आजही गरिबी, बेरोजगारी आणि सामाजिक विषमता यांसारखी आव्हाने आपल्यासमोर उभी आहेत. लोकशाहीमध्ये केवळ ‘प्रजा’ असून चालत नाही, तर ‘जागरूक नागरिक’ असणे गरजेचे आहे. हक्क मागताना कर्तव्यांची जाणीव ठेवणे, हाच प्रजासत्ताक दिनाचा खरा संदेश आहे.
तरुणाईचा संकल्प
आजचा भारत हा तरुणांचा देश आहे. नवीन पिढीने तंत्रज्ञानाच्या जोडीला संविधानाचे विचार आत्मसात केल्यास भारत नक्कीच ‘विश्वगुरू’ पदाकडे वाटचाल करेल. देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवणे हीच आजच्या काळाची गरज आहे. विविधतेत एकता हे आपले सामर्थ्य असून, ते जोपासणे हे प्रत्येक भारतीयाचे परमकर्तव्य आहे.
“उत्सव हा लोकशाहीचा, गौरव हा तिरंग्याचा, नतमस्तक होऊनी वंदूया, शिल्पकार संविधानाचा!”



