मुंबई

Eknath Shinde : “गेल्या वर्षी दादा सोबत होते…”; शिवनेरीवर भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

Eknath Shinde On Ajit Pawar : अजित पवारांच्या आठवणीने उपमुख्यमंत्र्यांचा कंठ दाटला; 396 व्या शिवजयंती सोहळ्यात वाहिली विनम्र श्रद्धांजली

किल्ले शिवनेरी | अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त आज शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, यंदाच्या सोहळ्याला एक भावनिक किनार लाभली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच शिवजयंती सोहळा असल्याने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहताच त्यांना अजितदादांची आठवण आली आणि ते भावूक झाले.

श्रद्धांजली अर्पण करताना दाटला कंठ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “गेल्या वर्षी याच सोहळ्याला अजित दादा आपल्यासोबत होते. आज त्यांची उणीव भासत आहे.” हे बोलताना उपमुख्यमंत्री भावूक झाले होते. “कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे, मी त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिवराय: हिंदुत्वाचा ओंकार आणि लोकशाहीचा आविष्कार
महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे वर्णन करताना मुख्यमंत्री म्हणाले, “शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, धैर्य, त्याग आणि समर्पणाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. हिंदुत्वाचा ओंकार आणि लोकशाहीचा खरा आविष्कार म्हणजे आमचे राजे आहेत. शिवनेरीच्या या पवित्र भूमीत आल्यावर आम्हाला एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते.”

विकासाचे आणि संवर्धनाचे नियोजन
यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी शिवनेरी आणि गडकिल्ल्यांच्या विकासासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या:

गडकोट संवर्धन: राज्यातील सर्व गडकोट किल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धनाचे कार्य सरकार प्राधान्याने हाती घेणार आहे.

जुन्नरचा विकास: शिवरायांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन सरकारने केले आहे.

आदर्श शासन: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवरायांचे निस्सीम भक्त असून त्यांच्याच प्रेरणेने आमचे सरकार ‘आदर्श राजा’ कसा असावा, याचा वस्तुपाठ गिरवत काम करत आहे.

सुनेत्रा पवार यांचे पहिले भाषण

मुख्यमंत्र्यांच्या आधी राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपले भाषण केले. अजित पवारांच्या निधनानंतर शिवनेरी गडावरील हे त्यांचे पहिलेच भाषण होते. “हा दिवस अत्यंत जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे,” असे सांगत त्यांनी जिजाऊ माँसाहेबांच्या संस्कारांचे स्मरण केले.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

14 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

14 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

19 hours ago