CM Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातही राजकारण तापले आहे. राहुल गांधींच्या विचारांशी देश कधीच सहमत होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई :- आरक्षणाच्या विधानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये, सीएम शिंदे म्हणाले, “राहुल गांधींचे Rahul Gandhi विचार त्यांची क्षुद्र मानसिकता दर्शवतात. राहुल गांधी जेव्हाही परदेशात जातात तेव्हा ते देशाविरुद्ध विष ओकतात.राहुल गांधींच्या वाईट विचारांशी देश कधीच सहमत होऊ शकत नाही.
विदेशात जाऊन सातत्याने भारताची येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला.
आरक्षण संपवण्याचा मनसुबा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना व महायुतीतील सहकारी पक्ष आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि आरक्षण संपवू देणार नाही, याची ग्वाही पुन्हा या निमित्ताने देत आहोत. आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू.
आपला भारत देश ही ‘फेअर प्लेस’ नाही, असे परदेशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसमोर बोलणं हे भारतातील नागरिकांसाठी अत्यंत अवमानकारक आहे. राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत, हे या निमित्ताने सिद्ध होते. अनेक सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपल्या बुद्धितेजाने लोकांची मने जिंकली आहेत. स्वामी विवेकानंदांपासून ते आजच्या आयटी क्षेत्रातील बुद्धिमंत विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी अमेरिकेत भारताचा ध्वज उंचावला आहे. त्या सगळ्यांचा अवमान राहुल गांधी यांनी केला आहे. देशाचा, आमच्या अस्मितांचा आणि नागरिकांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आणि मान्यही होणार नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो.
तुम्हाला सांगतो, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये म्हटले होते की, काँग्रेस पक्ष तेव्हाच आरक्षण संपवण्याचा विचार करेल जेव्हा भारतात आरक्षणाच्या बाबतीत निष्पक्षता असेल आणि आता तशी परिस्थिती नाही., येथे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राहुल यांना आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे किती दिवस सुरू राहणार असा सवाल केला होता. त्यावर ते म्हणाले, “जेव्हा भारतात न्याय्यता (आरक्षणाच्या बाबतीत) येईल, तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू.” “यासाठी भारत सध्या योग्य ठिकाण नाही.”राहुल म्हणाले, “जेव्हा तुम्ही आर्थिक आकडेवारी पाहता, तेव्हा आदिवासींना 100 रुपयांपैकी 10 पैसे मिळतात. दलितांना 100 रुपयांपैकी पाच रुपये मिळतात आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) लोकांनाही जवळपास तेवढीच रक्कम मिळते. त्यांना योग्य सहभाग मिळत नाही हे सत्य आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…