मुंबई

सोनिया गांधींच्या मतदारयादीतील नावावरून भाजपाचा काँग्रेसवर हल्ला — 45 वर्षांपूर्वी नागरिकत्व नसतानाही नोंद?

•अमित मालवीय आणि अनुराग ठाकूर यांचा गंभीर आरोप — निवडणूक कायद्याचे उल्लंघन

ANI :- लोकसभा आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोग आणि भाजपावर टीका करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींना आता भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच त्यांचे नाव बेकायदेशीरपणे मतदारयादीत समाविष्ट करण्यात आले होते.

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून सांगितले की, सोनिया गांधी यांचे नाव 1980 आणि 1983 मध्ये दोनदा मतदार यादीत समाविष्ट झाले होते, आणि त्या दोन्ही वेळी त्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व नव्हते. मालवीय यांच्या मते, हे प्रकरण निवडणूक कायद्याचे थेट उल्लंघन आहे. त्यांनी असा दावा केला की, हेच कदाचित कारण आहे की राहुल गांधी अपात्र किंवा बेकायदेशीर मतदारांना कायदेशीर करण्याच्या बाजूने आहेत आणि “स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन” प्रक्रियेला विरोध करतात.

दिल्लीतील भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही गांधी कुटुंबावर निशाणा साधला. ते म्हणाले,

“इंदिरा गांधी म्हणायच्या की मतदार मूर्खांचा समूह आहेत. राजीव गांधी निवडणुकीत हरले तेव्हा त्यांनी मतपत्रिकेला दोष दिला. त्यावेळी ईव्हीएमवर निवडणुका घेण्याची मागणी होती. आता राहुल गांधी पुन्हा मतपत्रिकेची मागणी करत आहेत. कुटुंबानेच ठरवावे की त्यांना नेमके काय हवे आहे.”

मालवीय यांनी आणखी स्पष्ट केले की, 1980 मध्ये जेव्हा सोनिया गांधींचे नाव मतदारयादीत आले, तेव्हा त्या अजून इटालियन नागरिक होत्या आणि पंतप्रधान इंदिरा गांधींच्या-1, सफदरजंग रोड, नवी दिल्ली येथील अधिकृत निवासस्थानी राहत होत्या.

vivek

Recent Posts