•प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
बारामती :- बारामती आणि इंदापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत असल्याने अनेक शेती पाण्याखाली गेली असून, घरांमध्येही पाणी शिरले आहे. या परिस्थितीमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, बारामती-इंदापूर रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि रात्रभर दोन्ही तालुक्यांमध्ये पावसाची संततधार कायम होती. याचा परिणाम म्हणून इंदापूर तालुक्यातील सणसर येथील पूल पाण्याखाली गेला आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर असणाऱ्या या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
याशिवाय, काझड येथे पावसाच्या पाण्यामुळे जोड कालवा फुटल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले असून, जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…