Asia Cup 2025 : नवख्या ओमान संघाची भारतीय गोलंदाजांची धुलाई; दोन फलंदाजांची अर्धशतकी खेळी
Asia Cup 2025 :– आशिया चषकाच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने ओमानवर 21 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना नवख्या ओमानच्या फलंदाजांनी चांगलीच झुंज दिली, त्यामुळे टी-20 वर्ल्ड चॅम्पियन संघाला हा विजय मिळवण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला.
भारताची फलंदाजी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 188 धावा केल्या. भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 56 धावांची दमदार खेळी केली. सलामीवीर अभिषेक शर्माने 38 आणि तिलक वर्माने 29 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
ओमानची कडवी झुंज
189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओमानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. कर्णधार जतिंदर सिंगने 33 चेंडूत 32 धावांची दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर आमिर कलीम (64 धावा, 46 चेंडू) आणि हमद मिर्झा (52 धावा, 33 चेंडू) यांनी आक्रमक अर्धशतकी खेळी करत 90 हून अधिक धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फलंदाजीमुळे ओमानचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता.
हार्दिक पंड्याचा मॅच-विनिंग झेल
ओमानच्या फलंदाजांनी धावांचा वेग वाढवला असतानाच, हर्षित राणाच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्याने सीमारेषेवर एक अविश्वसनीय झेल पकडला. हाच झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. या झेळमुळे ओमानचा धावांचा वेग मंदावला. अखेर ओमानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 167 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतीय गोलंदाजांनी आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…