मुंबई

Asha Bhosle : ‘ठाकरे भेटी’वर साऱ्यांचं लक्ष, पण आशा ताईंचं लक्ष फक्त “शेलारांवर”

Asha Bhosle On Ashish Shelar ; राजकारण नकोच, संगीत पुरेसे आहे – आशा भोसले यांची स्पष्ट भूमिका

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात मोठा चर्चेचा विषय म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? येत्या 5 जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने या दोन प्रभावी नेत्यांची युती घडणार का, यावर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. पण या चर्चांना गायिका आशा भोसले यांनी दिलखुलास आणि उपरोधिक उत्तर देत चक्क गालातल्या गालात राजकारणावरच झटका दिला.

आर. डी. बर्मन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना आशा भोसले यांना राज-उद्धव भेटीवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर त्यांनी अत्यंत साधेपणाने, पण रोचकपणे उत्तर दिलं – “मला राजकारण नकोच आहे. मला फक्त आशिष शेलारच माहिती आहेत. बाकी कोणी ओळखीचे नाहीत!”

या वक्तव्यामुळे राजकारणात चर्चेच्या झोतात असलेल्या ठाकरे युतीच्या चर्चा एका गायकवाडीनं जणू हळुवार थांबवल्या, असं म्हणावं लागेल. अनेकांना वाटलं होतं की ठाकरे कुटुंबाशी असलेल्या मैत्रीमुळे त्या अधिक स्पष्ट भाष्य करतील. पण आशा ताईंनी आपल्या खास शैलीत विषय हलकाफुलका करत, राजकारणातल्या गर्दीतून स्वतःला अलग ठेवलं.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago