•‘हा केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव’, अमित ठाकरेंची सरकारकडे मागणी
मुंबई :- महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज सकाळी भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांना एक निवेदनही दिले आहे, ज्यात त्यांनी कठोर शब्दांत इशारा दिला आहे की, जर सरकारने विद्यार्थ्यांच्या भावनांचा विचार केला नाही, तर मनविसे राज्यभर तीव्र आंदोलन करेल.
‘गणेशोत्सव काळात परीक्षा झाल्यास आंदोलन करू’, अमित ठाकरेंचा इशारा
मुंबईतील वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या कार्यालयात ही भेट झाली. यावेळी अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यांनी म्हटले आहे की, गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक सण नसून तो महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक ओळख आहे. विद्यार्थी आपल्या कुटुंबासह, समाजासह या उत्सवात सहभागी होणे हे त्यांच्या सांस्कृतिक नाळ जपण्यासाठी आवश्यक आहे.
अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात मुख्यत्वे तीन मागण्या केल्या आहेत
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…