•विशेष शोध मोहिमेत तीन महिलांना अटक; सुरक्षा यंत्रणा सतर्क
अंबरनाथ :- अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी परिसरात भारतीय वायुसेनेच्या संवेदनशील हद्दीला लागून असलेल्या अनधिकृत चाळींमध्ये बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हिललाईन पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका विशेष शोध मोहिमेत, तीन बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आले असून, त्यांना कायदेशीर कारवाईनंतर मायदेशी पाठवण्यात आले आहे. कमी पैशात घरे मिळत असल्याने बांधकाम माफियांचा फायदा होत आहे, मात्र यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
नेवाळी नाका आणि काटई-अंबरनाथ रस्त्यावर अनधिकृत चाळींचे जाळे वेगाने वाढत आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना सुरू असलेल्या या बांधकामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या चाळींमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना आश्रय मिळत असल्याने या भागात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. यापूर्वीही पोलिसांनी येथे अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे, ज्यात एका बांगलादेशी अभिनेत्रीचाही समावेश होता. पोलिसांच्या कारवाईनंतरही ही परिस्थिती कायम असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हिललाईन पोलिसांनी केलेल्या कारवाईत साथी आयुब शेख, रूपा हसन शेख आणि ज्योती अब्दुल शेख या तीन महिला नेवाळी आणि द्वारली परिसरात आढळल्या. त्यांना ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि मायदेशी पाठवण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या भागात अशाप्रकारे होणारी घुसखोरी चिंताजनक आहे. पोलीस यंत्रणेसोबतच सुरक्षा दलांनीही यावर अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…