देश-विदेश

Ajit Pawar : या जागेचे नाव बदलून श्री राम नगर करावे, अशी मागणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अमित शहा यांच्याकडे केली आहे.

•राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, रायगड जिल्ह्यात किंवा आसपासच्या भागात ‘श्रीराम नगर’ नावाचे दुसरे गाव नाही.

नवी दिल्ली :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी (4 एप्रिल) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ‘घावरेकोंड’ गावाचे नाव बदलून ‘श्रीराम नगर’ करावे, अशी मागणी केली आहे.गावकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्याचे नाव बदलले पाहिजे, असे ते म्हणाले.

सुनील तटकरे यांनी त्यांच्या एक्स हँडलवर याबद्दल लिहिले आहे.माझ्या लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ‘घावरेकोंड’ या गावाचे नाव बदलून ‘श्रीराम नगर’ असे करण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सादर केलेल्या प्रस्तावासंदर्भात मी आज केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह यांची भेट घेऊन निवेदन दिले. सदर प्रस्तावावर राज्य शासनाने बारकाईने विचारविनिमय केला असून, गावकऱ्यांच्या स्थानिक अभिमानाच्या व भाषिक भावना लक्षात घेऊन तसेच स्थानिक जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या नामांतरास मान्यता द्यावी, अशी मागणी मा. अमित शाह जी यांच्याकडे केली.

ते पुढे म्हणाले की,रायगड जिल्ह्यात किंवा त्याच्या आसपासच्या भागात ‘श्रीराम नगर’ नावाचे अन्य कोणतेही गाव अस्तित्वात नाही. तसेच, गावकऱ्यांकडून या नामांतरास कोणताही आक्षेप नोंदविण्यात आलेला नाही. स्थानिक जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेता माझा देखील गावकऱ्यांच्या या मागणीस पूर्णपणे पाठिंबा असून केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाहीसाठी निर्देश द्यावेत, अशी नम्र विनंती मा. अमित शाह यांच्याकडे केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0