•भारतीय संघाने नरिमन पॉइंटपासून खुल्या बस परेडला सुरुवात केली, त्यानंतर हार्दिक पंड्याने वानखेडे स्टेडियमवर ट्रॉफी फडकवली. रोहित शर्मा म्हणाला, ही ट्रॉफी संपूर्ण देशासाठी आहे.
मुंबई :- T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी आयोजित विजय परेडसाठी गुरुवारी मुंबईत मोठा जनसमुदाय जमला होता. आपल्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी हजारो क्रिकेट चाहते आतुर झाले होते. मुंबईत जमलेली गर्दी पाहून देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे आमदार Aaditya Thackeray यांचेही मोठे वक्तव्य समोर आले आहे.
Aaditya Thackeray ‘एक्स’ वर म्हणाले की,कालचा मुंबईतील सेलिब्रेशन बीसीसीआयसाठीही मजबूत संदेश आहे. मुंबईकडून विश्वचषक फायनल कधीही हिरावून घेऊ नका!” खरं तर, 2023 च्या वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला.
भारतीय संघाने वानखेडे स्टेडियमपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरिमन पॉइंटपासून खुल्या बस परेडला सुरुवात केली. यानंतर टीम इंडियाने वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश केला, जिथे हार्दिक पांड्याने मैदानाच्या मध्यभागी ट्रॉफी उचलली आणि चाहत्यांच्या दिशेने ओवाळली. रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी जोरदार डान्स केला. राष्ट्रगीतानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ही ट्रॉफी संपूर्ण देशाची आहे. ही एक विशेष टीम आहे आणि तिचे नेतृत्व करण्याचे भाग्य मला लाभले आहे. रोहितसाठी प्रेक्षकांचा उत्साह दिसून येत होता.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…