Abu Azami On Wani Statement : “वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी शब्द मागे घेतो”
मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातून टीकेचे धनी ठरलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी Abu Azami यांनी अखेर माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे. “कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो,” अशा शब्दांत त्यांनी स्पष्टीकरण देत मवाळ भूमिका घेतली आहे.
अबू आझमी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे वारकरी समाजाची क्षमा मागितली. त्यांनी नमूद केले की, “मी वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो.” त्यांच्या मते, सरकारच्या कथित दुटप्पी भूमिकेकडे लक्ष वेधणे हेच त्यांच्या वक्तव्यामागील प्रमुख कारण होते. अल्पसंख्याक समाजात भेदभावाची भावना निर्माण होऊ नये, यासाठीच त्यांनी उदाहरण स्वरूपात वारीचा उल्लेख केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“माझा हेतू धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता, फक्त सरकारच्या दुटप्पीपणाकडे लक्ष वेधायचे होते” – आझमी
सोलापूरमध्ये मी नुकत्याच केलेल्या एका टिप्पणीवरून पसरलेल्या गैरसमजुती मी स्पष्ट करू इच्छितो. माझे विधान विकृत आणि द्वेषपूर्ण पद्धतीने सादर केले गेले. जर त्यामुळे वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता.
मी एक समर्पित समाजवादी आहे आणि नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, सूफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो. वारी परंपरेचे पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आदर व्यक्त करतो. ही परंपरा महाराष्ट्राच्या सर्वव्यापी, समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अभिमानास्पद भाग आहे, ज्याचा मी वैयक्तिकरित्या आदर करतो.
मी वारी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लिम समुदायाविरुद्ध आणि त्यांच्या हक्कांविरुद्ध होणाऱ्या भेदभावाच्या संदर्भात केला होता. ही कोणत्याही प्रकारची तुलना नव्हती आणि माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती.
माझा एकमेव उद्देश सरकारचे लक्ष वेधण्याचा होता की त्यांच्या दुटप्पीपणा मुळे अल्पसंख्याक समुदायाच्या मनात अशी भावना निर्माण होऊ नये की या देशात त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत तर आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी स्वतः म्हणतात की सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास.
आम्ही उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी, आदरासाठी आणि समानतेसाठी जोरदार लढत राहू, परंतु देशाच्या एकतेला कधीही बाधा येऊ देणार नाही.
दरम्यान, सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना आझमी यांनी नमाज पठणावर मर्यादा घालणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करत वारकरी वारीच्या वेळी होणाऱ्या वाहतूक अडचणींचा उल्लेख केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. अनेक वारकरी संप्रदायांनी आणि राजकीय नेत्यांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…